शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने याकिल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला म्हणून संपुर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान अशी या गडाची ख्याती आहे.
जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गिरीदुर्ग आहे. घाटघरच्या परिसरात असलेला हा पुर्वाभिमुख किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला असावा. या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.घाटघर गावातुन पुर्वेच्या दिशेने जुन्नर दरवाजा मार्ग, नाणेघाटाच्या बाजुने वनविभागाच्या जंगलातून वर जाणारा कल्याण दरवाजा मार्ग.
निमगिरी–हनुमंतगड हा महाराष्ट्रातील पुणेजिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे . हे दोन किल्ले एकत्रितपणे एकाच टेकडीवर दोन शिखरे तयारकरतात. हडसर , चावंड , शिवनेरी, जीवधन, नारायणगड आणि सिंदोळा या किल्ल्यांबरोबरच हा सात महत्त्वाचाकिल्ला आहे ज्यांनी मध्ययुगीन काळात जुन्नर ते कल्याण बंदर नाणेघाटमार्गे व्यापारी मार्गाचे संरक्षण केलेहोते. जुन्नर शहरापासून २५ किमी (१६ मैल) अंतरावर असलेला हा किल्ला आहे.
चावंड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या आधुनिक शहरापासून ३० किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 1,036 मीटर(3,399 फूट) उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतराजीत आहे. इंग्रजांनी वेढा घालून किल्ला लुटला आणि नष्ट केला.
नारायणगड, जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळ, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर, समुद्रसपाटीपासून ८७६ मीटर उंचीवर आहे. हा किल्ला त्याच्या उंचीच्या दृष्टीने लहान असला तरी त्याच्या चारही बाजूंनी असलेल्या नैसर्गिक कातळकड्यांमुळे हा एक मजबूत गिरिदुर्ग मानला जातो.
सिंदोळा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात स्थित आहे, जो आपल्या प्राचीन किल्ले आणि लेणींसाठी प्रसिद्ध आहे. माळशेज घाटाच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला जुन्नरच्या वायव्य दिशेला, मढनेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोप्यात आहे. सिंदोळा किल्ला आपल्या सागरी आणि स्थलांतरित मार्गांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता.
हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणाराअजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एकआहे. एखाद्या स्थळाचाअथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड.