जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक आश्चर्य

किल्ला हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा ठाणेपुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणाराअजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. एखाद्या स्थळाचाअथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहासकुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेवसमाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
  • हरिश्चंद्रेश्वराचे मंदिरयेथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
  • चार खांबचार युगांचे प्रतीक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदीआहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीवगुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये [केदारेश्वराची] लेणी आहे. यामध्येभलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
  • कोकणकडागडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. तीन हजार फूट खालीकोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणिजपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडामहाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतरकड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
इतिहास

या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिरआहेसह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. १७४७४८ मध्ये हा किल्लामराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्तीकेली. हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावरश्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.

परिवहन पर्याय: हरीशचंद्र गड

रस्ता मार्गाने (By Road):

  • मुंबईहून: मुंबईहून हरीशचंद्र गडापर्यंत जाण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्ग वापरावा लागेल. मुंबईपासून हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी सुमारे 150 कि.मी. अंतर आहे. या प्रवासात साधारणतः 4-5 तास लागतात.
  • पुण्याहून: पुण्याहून हरीशचंद्र गडापर्यंत जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्ग वापरावा लागेल. पुण्यापासून हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी सुमारे 125 कि.मी. अंतर आहे. या प्रवासात साधारणतः 3-4 तास लागतात.
  • कल्याणहून: कल्याणहून हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी सुमारे 96 कि.मी. अंतर आहे. प्रवासात साधारणतः 2-3 तास लागतात.

बस सेवा (By Bus):

  • एसटी बस सेवा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेस पुणे, मुंबई, कल्याण येथून हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी उपलब्ध आहेत. या बससेवा हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचवतात आणि तिथून ट्रेकिंग सुरु करावे लागते.

खासगी वाहतूक (Private Transport):

  • स्वखाजगी वाहन: जर तुम्ही स्वखाजगी वाहनाने प्रवास करत असाल तर हरीशचंद्र गडाच्या पायथ्याशी पोहोचता येईल आणि तिथून ट्रेकिंग सुरु करावे लागते.

गाईड

. बाळू कावजी मेमाणे९१५८५४०५१२

. लक्ष्मण संतू मेमाणे९०४९१६१८६२