हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणाराअजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. एखाद्या स्थळाचाअथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहासकुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेवसमाजाकडेच होता. या किल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहे
या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिरआहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. १७४७–४८ मध्ये हा किल्लामराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्तीकेली. हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावरश्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.
परिवहन पर्याय: हरीशचंद्र गड
रस्ता मार्गाने (By Road):
बस सेवा (By Bus):
खासगी वाहतूक (Private Transport):
गाईड
१. बाळू कावजी मेमाणे – ९१५८५४०५१२
२. लक्ष्मण संतू मेमाणे – ९०४९१६१८६२