जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

बिबट हॉटस्पॉट ठिकाणे

जुन्नर,आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यातील  खालील तक्त्यातील 233 गावांनासंभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रम्हणून घोषित केलेले आहे.
अ.क्र.वनविभागवनपरिक्षेत्रतालुकागावे
1जुन्नरजुन्नर (२७ गावे )जुन्नरनारायणगांव, पिंपळगाव तर्फे ना. गाव, ओझर, डिगोरे, कुसुर, तांबे, मांजरवाडी, वडगाव साहनी, आर्वी, कुमशेत, पारुंडे, शिरोली खु. शिरोली बु हिवरे खु. हिवरे बु. हिवरे तर्फे नारायणगांव, गोळेगाव, सावरगाव बस्ती, बल्लाळवाडी, पिंपळगाव सिध्दनाथ, सोमतवाडी, सावरगांव, वारुळवाडी, तेजेवाडी, आगर, धामणखेल.
2जुन्नरओतूर (३६ गावे)जुन्नरओतूर, अहिनवेवाडी, खामुंडी, उदापूर, मांदारणे, डिंगोरे, काळवाडी, आळे, राजुरी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, पारगांव त. मढ, बेल्हे, बांगरवाडी, रानमळा, शिंदेवाडी, गुंजाळवाडी, पारगांव त. आळे, मंगरुळ, पिंपरी कावळ, नळावणे, खोडद, निमगाव सावा, हिवरे तर्फे नारायणगांव, कांदळी, येडगाव,शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, बोरी बु., बोरी खु., उंब्रज नं.1, उंब्रज नं.2, 3 पिंपळवंडी, वैशाखखेडे, ढोलवड, डुंबरवाडी
3जुन्नरशिरुर (७२ गावे )शिरुरआण्णापूर, अरणगांव,, आपटी,, आलेगाव पागा, इनामगांव, करंदी, कुरुळी, गणेगाव दुमाला, गुणाट, पिंपरखेड, चांडोह, चिंचणी, जांबुत, जातेगाव खु., टाकळी हाजी, तांदळी, निमगाव म्हाळुंगी, निमोणे, न्हावरा, पिंपळसुटी, फाकटे, बाभुळसर बु., मांडवगण फराटा, म्हसे बु., रांजणगांव सांडस, वडगाव रासाई, वडनेर खु., वढु बु., शरदवाडी, शिरुर ग्रामीण, सादलगांव, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भिमा, कोरेगाव भिमा, काठापुर खु. आमदाबाद, आंधळगाव, आंबळे, उरळगाव, करंजावणे, कडेलवाडी, कवठे यमाई, कोंढापुरी, कोळगाव, डोळस, गणेगाव खालसा, जातेगाव बुद्रुक, डोंगरगण, तळेगाव ढमढेरे, दहिवडी, धामारी, निमगाव दुडे, निमगाव भोगी, निर्वी, पारोडी, बाभुळसर खुर्द, बुरंजवाडी, भांबर्डे, मलठण, माळवाडी, मुखई, वरुडे, वाघाळे, विठ्ठलवाडी, शिंदोडी, शिरसगाव काटा, सविंदणे, सणसवाडी, धानोरे, नागरगाव, डिग्रजवाडी
4जुन्नरमंचर (२२ गावे )आंबेगाववडगाव काशिंबे, सुलतानपूर, लांडेवाडी, चिंचोडी, नारोडी, चांदोली खु.,कळंब, चांडोली बु. लौकी, खडकी, पिंपळगाव, एकलहरे, साकोरे, वळती, नागापुर, लाखनगाव, गावडेवाडी, शिंगवे, काठापूर, पारगाव, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक
5जुन्नरघोडेगाव (२७ गावे )आंबेगावकोळवाडी, घोडेगाव, गवारवाडी, दरेकरवाडी, शिंदेवाडी, साल, पिंपळगाव त. घोडा, पोखरकरवाडी, ढाकाळे, चिंचोली, गिरवली, गोहे बु., आधाणे कानसे, फुलवडे, गंगापुर खु., आपटी, आमोंडी, कोलदरा-गोणवडी, पोखरी भेंडारवाडी, पारंडा, काळेवाडी, कोटमदरा, शिनोली, गोहे, उगलेवाडी
6जुन्नर खेड राजगुरुनगर (२१ गावे)खेडराजगुरुनगर सातकरस्थळ, भांबुरवाडी खालची व वरची, भिवेगाव, कड्डुर जऊळके खु., निमगाव, रानमळा, दावडी, वडगांव पाटोळे, रेटवडी, खरपुड खु., दोंदे, वडगाव पाटोळे, टाकळकरवाडी, कनेरसर, मांजरवाडी, किवळ कुरकुंडी, पाडळी, चास.
7जुन्नरचाकण (२८ गावे)खेडचाकण, आळंदी, च-होली, कोयाळी, साबळेवाडी, बहुळ, पिंपळगाव त. चाकण,. शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, काळुस, दौंडकरवाडी, कोरेगाव बु. चांदुस, करंजविहिरे, संगमवाडी, मरकल, वडगाव घेणंद, गोलगाव, पिंपरी बु, आसखेड, चिंचोशी, सिध्देघवान, चिबंळी, धानोरे, केलगाव, अंबोली (तांबडेवाडी), राक्षेवाडी, कडाचीवाडी

मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना

1.सार्वजनिक बांधकाम विभाग

  • रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले मोठे गवत, झाडे-झुडपे
  • मुख्यत्वे वळणावर रस्ता पार करताना वन्यप्राणी व मानव यामध्ये चकमक
  • गाडीवरून पडणे याष्टना
  • वाहन चालक व वन्यप्राणी दोघांनाही इजा
  • संध्याकाळच्या वेळेस मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता असते

उपाययोजना

  • रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अनावश्यक गवत, घाणेरी, तत्सम झाड-झुडपे साफसफाई करणे.
  • त्यामुळे मनुष्य व वन्यप्राणी यांच्यासाठी दृश्यमानता वाढून वन्यप्राण्यांना रस्ता सहज दिसेल.
  • मनुष्यावर बिबट हल्ले घडणाऱ्या घटना, वन्यप्राणी व दुचाकी अपघात कमी होण्यास मदत होईल. आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे व माहिती फलक लावणे

2.पोलिस विभाग

  • कामाच्या निमित्ताने कामगार, मजूर ऊसतोड कामगार हे बाहेरच्या राज्यातून तसेच इतर गावांतून येतात. – त्यांना बिबटप्रवण क्षेत्राची माहिती नसते.
  • माहितीअभावी बिबटप्रवण क्षेत्रात त्यांची ये-जा होते.
  • मानव-बिबट संघर्षाच्या घटना घडतात

 उपाययोजना

  • ग्रामपंचायतमार्फत नोंद झालेल्या इतर राज्यातील मजूर, मेंढपाळ, नव्याने रहिवासी व्यक्ती याबाबत वनविभागास अवगत करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे. अशा नोंदीमुळे नव्याने बिबट प्रवण क्षेत्रात कामाला आलेल्या लोकांमध्ये जनजागृती करता येईल. अतिगर्दीच्या ठिकाणी बिबट रेस्क्यू करत असताना गर्दीला नियंत्रित करणे. मनुष्यावर हल्ला झाल्यास व त्यात त्याचा मृत्यू झाल्यास वन कर्मचाऱ्यांना तत्काळ संरक्षण देणे. मृत व्यक्तीचे पंचनामा, शवविच्छेदन, इन्क्वेस्ट रिपोर्ट

3.महावितरण विभाग

  • रात्रीच्या वेळेस पिकाला पाणी देणेकरीता शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागते.
  • बहुतांशी बिबट मानव संघर्षांच्या घटना या रात्रीचे वेळी घडतात
  • शेतात काम करताना घटना झाल्याच्या दिसून येतात

उपाययोजना

  • महावितरण विभागामार्फत बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा विद्युत पुरवठा करणे. जेणे करून शेतकऱ्यांचे रात्री शेतात जाणे टळून मानव बिबट संघर्ष कमी होणेस मदत होईल.

4.आरोग्य विभाग

  • मनुष्यावर हल्ला झाल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे आवश्यक.
  • बऱ्याच वेळा रुग्णालयात रेबीज अथवा सिरम उपलब्ध नसल्याने जखमी व्यक्तीला पुणे येथे रुग्णालयात दाखल करावे लागते.
  • ज्याकरिता मनुष्यबळ व वेळ वाया जातो.
  • उशीर झाल्यास हल्ला झालेल्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो

उपाययोजना

  • आरोग्य विभागाने सर्वाी औषध उपचारांची व इतर सोयीची व्यवस्था स्थानिक पातळीवर तयार ठेवणे. त्यामुळे हल्ला झालेल्या व्यक्तीवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल. रेबीज व सिरम कमीत कमी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी उपलब्ध ठेवणे. बिबट प्रवण क्षेत्रातील गावांतील डॉक्टरांना वन्यप्राणी हल्ला झाल्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचे प्रशिक्षण देणे

5.ग्रामपंचायत, जिल्हा परिषद

  • मेंढपाळ, मजूर हे बिबट प्रवण क्षेत्राची माहिती नसल्याने ते उघड्यावर जागा मिळेल तिथे वास्तव्य करतात.
  • मानव-बिबट संघर्ष झाल्याच्या घटना अनेक ग्रामपंचायत हद्दीत घडल्या आहेत.
  • अनेकवेळा गावात पशुधन हानीच्या घटना घडतात.
  • घटनेची नोंद ग्रामपंचायत तसेच पशुवैद्याक्रीय अधिकारी येथे कोठेच नसते.
  • झालेले नुकसान भरपाई अदा करताना अडचणी येतात

उपाययोजना

  • गावात नव्याने येणारे मेंढपाळ, मजूर यांची माहिती वेळीच वनविभाग व पोलिस ठाण्यात देऊन त्यांना बिबट प्रवण क्षेत्राबाबत सर्व माहिती करून देऊन जनजागृती करणे. त्यांना राहणे करिता टेंट व लाईटची सुविधा उपलब्ध करून देणे. त्यामुळे त्यांचे उघड्यावर झोपणे टाळून संभाव्य हल्ला टळेल. पशुधनास १०० टक्के टॅगिंग करून घेणे व त्याकरिता पशुधन मालक व संबंधित यंत्रणा यांचा समन्वय साधून देणे.

6.पशुसंवर्धन विभाग

  • अनेक वेळा एकाच वेळी पशुधन हल्ल्याच्या एका पेक्षा अधिक घटना घडतात.
  • अशा वेळी पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन अहवाल सादर करताना उशीर होतो.
  • वनविभागास पशुधन हानी नुकसान भरपाई प्रकरणे मुदतीत पारित करणे शक्य होत नाही.

उपाययोजना

  • पशुधन हानी प्रकरणामध्ये वेळेत योग्य शवविच्छेदन अहवाल सादर करणे. जेणेकरून नुकसान भरपाई प्रकरणे मुदतीत पारित करणे शक्य होईल

7.पाटबंधारे विभाग

  • विभागामार्फत तयार केलेल्या कालव्यांचे दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाड झुडपे दिसून येतात.
  • ज्यामुळे बिबट्यास लपण्यासाठी जागा तयार होते.
  • कालव्यातील कच्चे रस्ते शेतीसाठी वापरताना सकाळी संध्याकाळी मानव- बिबट संघर्ष उद्भवतो.

उपाययोजना

  • कालव्यांचे दुतर्फात असलेल्या क्षेत्रावरील झाड झुडपे, गवत प्रत्येक वर्षी साफसफाई करणे. जेणेकरून मानव- बिबट संघर्ष कमी होण्यास मदत होईल

8.जिल्हा परिषद शिक्षण विभाग

  • विद्यार्थी व पालकांमध्ये मानव-बिबट संघर्ष बाबत जनजागृती करणे.

उपाययोजना

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती विषयक कार्यक्रम राबविणे. जेणेकरून लहान मुलांमध्ये मानव-विवट संघर्षाबाबत प्रबोधन होईल. याकरिता वनविभागाशी समन्वय साधणे

9.महसूल विभाग (तहसिल कार्यालय)

  • वाढती बिबट संख्या व त्यांचे नियंत्रण हा केवळ वनविभागापुरता मर्यादित राहिला नसून आपत्ती व्यवस्थापनाचा विषय बनला आहे.

उपाययोजना

  • मानव-बिबट संघर्ष घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आल्यास सर्व शासकीय यंत्रणांचे सनियंत्रण करून त्यांचे स्तरावर वनविभागास सहकार्य करणे.

10.नगरविकास विभाग

  • नगरपरिषदेच्या हद्दीतील कचरा, खराब अन्न उघड्यावर टाकल्याने तेथे कुत्रे, डुकरे व इतर तस्तम प्राणी येऊन त्या ठिकाणी थांबतात.
  • ज्यामुळे बिबट्यास सहज भक्ष मिळाल्याने तो मानवी वस्तीत स्थिरावतो.

उपाययोजना

कचरा, निर्माल्याचे योग्य नियोजन करणे. तसेच हद्दीतील कुत्रे, डुक्करे व इतर तत्सम प्राणी याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे. कच्चा मासांहार विक्री करणारी दुकाने यांच्यासाठी नियमावली बनवून त्याचे पालन होईल, याची काळजी घेणे

11.साखर कारखाने

  • ऊस पीक हे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे.
  • ऊस तोडणीसाठी आलेले कामगार व वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष उद्भवतो.

उपाययोजना

  • ऊसतोड हंगामावेळी आलेल्या मजुरांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे. फक्त दिवसाच्या उजेडात ऊसतोड करणे. ऊस क्षेत्रात विवट्याची पिल्ले सापडल्यास याबाबत वनविभागास माहिती देणे.

12.राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

  • जुन्नर वनविभाग हद्दीतून दोन महामार्ग जात असून रस्ता ओलांडताना वाहनाशी धडक होऊन वन्यप्राणी मृत्यू पावतात.

उपाययोजना

महामार्गावरील वन्यप्राण्याचे रस्सा ओलांडण्याचे ठिकाण ओळखून त्या ठिकाणावरून गाड्यांचे वेग कमी करण्याची आवश्यकता आहे. जागोजागी माहिती फलक लावणे, गतिरोधक उभारणे. तसेच अपघात झाल्यास वन्यप्राण्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करणे.

13.कृषी विभाग

  • शेतकरी ऊस, केळी यांसारखी पिके घेतात.
  • येथे वन्यप्राण्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध असते.
  • त्यामुळे मानव-बिबट संघर्ष उद्भवतो.

उपाययोजना

  • शेतकऱ्यांना बिबट प्रवण क्षेत्रात ऊस पीक टाळून नवीन किफायतशीर पीक पद्धती घेण्यासाठी प्रेरित करणे. शेतामध्ये तणनाशके, रासायनिक खते यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे जेणेकरून या क्षेत्रातील त्रणभक्षी प्राण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. कृषीविभागाने ऊस शेती तसेच हत्ती गवत व इतर झाडोरादर्शक प्रजातीची लागवड करते वेळी घरापासून, रस्त्यापासूनचे अंतर किती असावे. काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात. जेणेकरून मानव- बिबट संघर्षाच्या घटना टाळता येतील