चावंड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या आधुनिक शहरापासून 30 कि.मी. अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे. समुद्रीसपाटीपासून 1036 मीटर (3399 फुट) उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेला आहे. इंग्रजांनी वेढा घलून किल्ला लुटला व उद्धस्त केला. फेमस 5 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. चावंड, हडसर, शिवनेरी, जीवधन आणि नाणेघाट हे फेमस 5 ट्रेक आहेत. किल्ल्यावर 800 वर्षाहून अधिकजुन्या बांधकामाचे अवशेष आहेत चावंड हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे
मुख्य प्रवेशद्वार –
पुरातन बांधील पायऱ्यांची चढण संपल्यानंतर आपण या एकमेव प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या दगडी चौकटीवर गणेशपट्टी आहे.
मंदिर –
गडाच्या सर्वात उंच भागात चावंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. व मंदिराच्या समोर एक दिपस्तंभ आहे.
सप्तमातृका (टाकी समूह) –
गडावर पाण्याच्या सुमारे वीस टाक्या आहेत. त्यापैकी सप्तमातृका टाकी समूह हा वैशिषट्ये पुर्ण असून सप्तमातृका या पुराणातील शब्दाशी निगडीत आहे. या सात टाक्यांपैकी पहिल्या टाकीला कातळकोरीव पायरीयुक्त प्रवेशद्वार आहे तसेच या प्रवेशद्वारावर दाक्षिणात्य शैलीतील सुंदर गणेश पट्टी पहावयास मिळते.
अवशेष –
गडाच्या परिसरात अनेक अवशेष आढळतात. गडाच्या ईशान्येस कातळकोरीव लेणी आहेत, ज्या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक लेणी अगदी सुस्थितीत आहे.
गुहेत प्रवेशकेल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते.
या लेणी लगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात
अवशेषरुपातील पुष्कर्णी –
गडाच्या मध्यावर आल्या नंतर एक पायऱ्यांचा तलाव व तलावालगत देवतांच्या मुर्ती ठेवण्यासाठी बांधली गेलेली, देवकोष्ठे तसेच एक कमान अवशेष रुपामध्ये दिसते. हे शिवालय असावे. राजस्थानमधील पुष्कर परिसरात आढळणाऱ्या पुरातन मंदिरासारखी या परिसराची रचना असल्याने यास पुष्कर्णी असे संबोधले जाते.
निजामशाही राजघराण्याचे संस्थापक निजाम अहमद हे पहिले निजामशाह होते ज्यांनी बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर चावंडचा किल्ला ताब्यात घेतला. सातवानिजामशाह बुरहानशहा दुसरा होता. बहादूरशहाच्या नातवाला १५९४ मध्ये कैद करून या किल्ल्यावर नेण्यात आले. बहादूरशाह हा चांदबीबीचा पुतण्या. १६३६ मध्ये निजामाशीतह करून मुघलांना चावंडचा किल्ला मिळाला. 1 मे 1818 रोजी ब्रिटिश सैन्याने किल्ला ताब्यात घेतला.
उमेदवाराचे नांव | गाव | मोबाईल नंबर |
---|---|---|
संगम दिनकर गायकवाड | खानगांव | 9503548823 |
प्रमोद अर्जुन सुपे | चावंड | 8007365807 |
किरण दिलिपकुमार म्हसकर | केळी | 9011110569 |
प्रकाश उमाकांत केदार | तेजूर | 9689018273 |
योगिता बबन बांबळे | माणकेश्वर | 8379082404 |